नायगाव, (वार्ताहर) – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रा अभियान सुरू करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा पुणे जिल्हा दक्षिण यांच्या वतीने ग्राम परिक्रमा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे व जिल्हाध्यक्ष तानाजी थोरात यांच्या मार्गदर्शनानुसार किसान मोर्चा पुरंदर तालुक्याच्या वतीने पुरंदर तालुक्यातील नायगाव, माळशिरस, पोंढे, टेकवडी आदी भागांमध्ये ही ग्राम परिक्रमा यात्रा गेली. शेतकरी, तरुणांचा, शेतमजुरांचा, महिला भगिनींचा या परिक्रमा यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
शेतकर्यांच्या अडीअडचणी समजून केंद्र व राज्य शासनाच्या शेतकर्यांसाठीच्या योजनांची माहिती यावेळी दिली गेली. संपूर्ण ग्रामपरिक्रमा यात्रेत किसान मोर्चा तळागाळातील शेतकर्यांच्या आकांक्षा आणि सूचनांना घेऊन जाईल. यात्रेदरम्यान राज्य आणि केंद्राचे विविध प्रमुख कार्यक्रम तळागाळापर्यंत ठळकपणे पोहचविले जातील असे सांगण्यात आले.
या परिक्रमामध्ये किसान मोर्चा भाजपा पुरंदर तालुका अध्यक्ष संदीप देवकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेंडकर, भाजपा किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष सचिन पठारे, उपाध्यक्ष रोहिदास कड, हनुमंत कापरे, दत्ताशेठ नाझीरकर, हरिश्चंद्र थेऊरकर आदी पदाधिकार्यांनी व कार्यकर्त्यांनी भाग घेतला. या यात्रेमधून शेतकर्यांना सरकारच्या ध्येय धोरणांची व योजनांची चांगली माहिती मिळाल्यामुळे शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.