मुंबई – Gram Panchayat Result: काल रविवारी झालेल्या 547 ग्रामपंचायत निवडणूक मतदानानंतर आज निकालाचे आकडे समोर येत आहेत. 608 ग्रामपंचायतीमधील काही ठिकाणचे निकाल समोर आले असून त्यामध्ये भाजपची सरसी असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत निवडणूक राजकीय चिन्हावर लढवली जात नसली तरी राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते.
608 ग्रामपंचायतींपैकी 495 ठिकाणचे निकाल समोर आले आहेत. त्यामध्ये भाजप -143, राष्ट्रवादी – 127, काॅंग्रेस 59, शिंदे गट-41, शिवसेना -37 आणि इतर -88 अशी आकडेवारी समोर आली आहे. भाजप+शिंदे गट – 184 तर महाविकास आघाडीला – 223 ठिकाणी विजय मिळाला आहे. भाजपने सर्वाधिक 143 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान, अद्यापही काही ग्रामपंचायतींचा निकाल येणे बाकी आहे. विजयी उमेदवारांचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळत आहे. माहिती अपडेट होत आहे….