राजेंद्र वाघमारे
नेवासा – वारंवार विविध राजकीय संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी देऊन आणि आंदोलने करुनही अहमदनगर – छञपती संभाजीनगर महामार्गावरील खडका फाटा येथील के.टी.संगम कंपनीचा टोलनाका वाहनधारकांना सुविधा न देता टोल वसूली करत आहे. या कंपनीच्या विरोधात आता शासनानेच गुन्हा दाखल करण्याची मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे. शासनाने वेळीच दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी वाहनधारकांनी दिला आहे.
‘बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा’ या तत्वावर के.टी संगम कंपणीच्या टोलनाका कंत्राटदाराला महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम देण्यात आलेले होते. माञ शासनाच्या नियम व अट्टींप्रमाणे वाहनधारकांना या टोलनाक्यावर मुलभूत सुविधा उपलब्ध केल्या जात नसल्यामुळे वेळोवेळी विविध राजकिय संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊन उग्र आंदोलने केलेली आहेत.
माञ संबंधित कंपनीकडून या आंदोलनाच्या मागणीकडे सततच दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वाहनधारकांतून केला जात आहे त्यामुळे सुविधा न देणाऱ्या टोलनाका कंपणीचा टोलनाका हटविण्याची मागणी वाहनधारकांडून केली जात असून शासनाने त्वरीत कारवाई न केल्यास तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी वाहनधारकांनी दिला आहे.
अहमदनगर – छञपती संभाजीनगर महामार्गाचे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर महामार्गावर खडका फाटा येथे टोलनाका बसवून कंपनीकडून वसुली सुरु करण्यात आलेली आहे. या टोलनाका कंपनीला सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्त्वावर रस्ता कंञाट देवून टोल वसूलीला शासनानाकडून मान्यता दिलेली होती. माञ या कंञाटदाराकडून वाहनधारकांना सुरुवातीपासूनच टोलनाक्यावर सुविधा दिल्या जात नसल्यामुळे कायमच हा टोलनाका वादग्रस्त राहत आलेला आहे.
तसेच या कंपनीने महामार्गाचे काम करतांना शेकडो वृक्षांची कत्तल केल्यामुळे पर्यावरणाचा समतोलही बिघडविलेला आहे त्यामुळे रस्ता कामासाठी तोडलेली झाडी पुन्हा वृक्ष लागवड करुन लावण्यात आल्याचे कागदोपञी सरकारला दाखवून कंपनीकडून शासनाची फसवणूक करण्यात आलेली अाहे.
या महामार्गावर वाहनधारकांसाठी अनपेक्षित घटना घडल्यास आरोग्य, रुग्णवाहिका आणि शौचायल तसेच पिण्याच्या पाण्याची साधी व्यवस्था देखील करण्यात आलेली नाही. सुविधा न देता केवळ अर्थिक मिलीभगत करुन शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत दिवसाढवळ्या वाहनधारकांच्या डोळ्यात धुळफेक करुन फसवणूक केली जात आहे. त्यामुळे या टोलनाक्यावर वाहनधारकांना सुविधा न देता हा वसूली अड्डा सुरु झालेला आहे.
या महामार्गावरील रस्त्यावर रस्ता दुभाजक व रस्त्यावर साईडपट्ट्याही आखलेल्या नसून रस्त्यात खड्डे पडलेले असल्यामुळे येथे दररोजच अनेक अपघात होत आहेत. या अपघाताला केवळ के.टी.संगम कंपणीलाच जबाबदार धरुन या कंपणीवर अपघात झाल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही वाहनधारकांतून केली जात आहे.
टोलनाका प्रशासनाने रस्ता दुरुस्ती व सुविधा न देता केवळ आश्वासनांची खैरात देऊन आंदोलने गुंडाळली जात असल्यामुळे शासनाच्या नियमाला अधिन राहून या टोलनाका कंपणीने वाहनधारकांकडून बोगस वसूली करुन शासनाच्या निमयांची पायमल्ली केली जात आहे. यामुळे टोलनाका कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी वाहनाधरकांनी दिला आहे.
कोणी ‘राजमान्यता’ दिली ?
रस्ता दुरुस्ती केली जात नाही, दुभाजक मोडलेले आहेत. विना परवाना हॉटेल समोर रस्ता मोडलेला आहे. रस्त्यावर साईडपट्ट्या नाहीत आणि टोलनाक्यावर वाहनधारकांना सुविधाही मिळत नसल्यामुळे या टोलनाक्यावर वसुली करण्यास कोणी ‘राजमान्यता’ दिली असा सवालही वाहनधारकांसह जनतेतून केली जात आहे.