नवी दिल्ली – हरित क्षेत्र वाढवण्यासाठी आणि पर्यावरण संरक्षणासाठी 1 हजार 400 किलोमीटर लांबीची ‘ग्रीन वॉल’ तयार करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आफ्रिकेत सेनेगल पासून जिबूतीपर्यंत तयार करण्यात आलेल्या हरित पट्ट्याच्या धर्तीवर गुजरातपासून दिल्ली-हरियाणाच्या सीमेपर्यंत ‘ग्रीन वॉल ऑफ इंडिया’ उभारण्यात येणार आहे.
दरम्यान, हा प्रकल्प सुरूवातीच्या टप्प्यात आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर भविष्यकाळात वाढत्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकत. थार वाळवंटातून ही भिंत विकसित केली जाणार आहे. याव्यतिरिक्त गुजरात, राजस्थान, हरियाणा ते दिल्लीपर्यंत परसलेल्या अरावली डोंगरावरील कमी होणाऱ्या हरित पट्ट्याच्या संकटावरही मात करता येऊ शकते अशी माहिती मिळत आहे.
भारतातील कमी होणारा हरित पट्टा आणि वाढत वाळवंट रोखण्यासाठी ही कल्पना संयुक्त राष्ट्रांच्या कॉन्फरन्समधून मिळाली आहे. सध्या ही कल्पना प्राथमिक टप्प्यात असून अद्याप ती मंजुरीपर्यंतदेखील पोहोचली नसल्याची माहिती मिळाली आहे.