नगर -देशभरात महाराष्ट्रात सर्वात जास्त करोनाचे रुग्ण आढळले आहेत. राज्य सरकारने हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावशकत्या उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढतच आहे. महाविकास आघाडी सरकार राज्यात करोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरले आहे. असे मयुर बोचुघोळ म्हणाले.
महाविकास आघाडीचा निषेध करण्यासाठी भाजपाने पुकारलेल्या महाराष्ट्र बचाव आंदोलनात नगरमध्ये भाजपाच्यावतीने चौपाटी कारंजा येथील स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुतळ्याजवळ निषेध करण्यात आला. याप्रसंगी मयुर बोचुघोळ, प्रदीप परदेशी, गणेश गुजराथी, अमीत पाखले, तुषार पोटे, बंट्टी ढापसे, अभिजित चिप्पा, सुखदेव लोळगे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी जी यंत्रणा राबविण्याची आवश्यकता होती ती राबविली नसल्याने अनेकांचे हाल झाले आहेत. राज्य सरकारने या संकटातून मार्ग काढण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढीचा धोका निर्माण झाला असून, मजुर, कामगार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यावेळी शासनाचा काळे मास्क व काळ्या फिती लाऊन निषेध करुन धिक्कार करण्यात आला. यावर लवकरात लवकर उपाययोजना लागू करुन सर्वसामान्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.