नवी दिल्ली – गुगलने जून महिन्यात भारतातील 83 हजार 613 आक्षेपार्ह कंटेंट काढून टाकल्याची माहिती त्यांच्यावतीने ट्रान्स्परन्सी अहवालात देण्यात आली आहे. युजर्सकडून आलेल्या तक्रारीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
मे महिन्यात अशाच तक्रारींवरून एकूण 71 हजार 132 कंटेंट काढून टाकण्यात आली होते. त्या खेरीज गुगलच्या ऑटोमेटिक तपासणीतून जून महिन्यात तब्बल 6 लाख 34 हजार 357 कंटेंट काढून टाकण्यात आले आहेत. भारताच्या नव्या आयटी कायद्यानुसार गुगलने ही माहिती सादर केली आहे.
एप्रिल महिन्यापासून युजर्स कडून येणाऱ्या तक्रारीवर कार्यवाही करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा गुगलने कार्यान्वित केली आहे. एप्रिल महिन्यात युजर्सकडून आक्षेपार्ह कंटेंट बाबत एकूण 27 हजार 700 तक्रारदारांनी तक्रार केली होती.
त्यानुसार त्या महिन्यात 59 हजार 350 कंटेंट गुगलवरून काढून टाकण्यात आले होते. सोशल मिडीयातील पोस्ट्स मध्ये आक्षेपार्ह किंवा बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यास त्यासंबंधात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्यावर ही कारवाई केली जात आहे.