दिवाळी हा सण देशभरात साजरा केला जातो, सध्या देशभरात दिवाळी जल्लोषात साजरी केली जात आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण नातेवाईकांकडे भेटी देण्यासाठी जातात तर काही गावी जातात. यादरम्यान, धनत्रयोदशी आणि रविवारी लक्ष्मी पूजन आणि नरक चतुर्दशी देखील मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अशात बुधवारी भाऊबीज साजरी होणार आहे.
अशातदिवाळीनिमित्तानं बाहेर पडणाऱ्यांसाठी बेस्टनं मोठा निर्णय घेतला आहे. बेस्ट मुंबई आणि मुंबई उपनगरे आणि जवळच्या विविध महापालिका क्षेत्रातील बसेसच्या फेऱ्या वाढवणार आहे. तब्बल १४५ अधिक गाड्या सोडल्या जाणार असल्याची माहिती आहे. या बसेस मुंबईमार्गे मीरा-भाईंदर, ठाणे आणि नवी मुंबईला सेवा देण्यासाठी सज्ज आहेत.
प्रवासीसंख्येच्या वाढीचे व्यवस्थापन करण्यासाठी, बेस्टचे निरीक्षक रेल्वे स्थानक आणि प्रमुख बसस्थानकाबाहेरील गर्दीच्या ठिकाणी धोरणात्मकरीत्या तैनात केले जातील. त्यांच्या भूमिकेत सुव्यवस्थित रांगा सुनिश्चित करणे आणि सुरळीत बोर्डिंग प्रक्रिया सुलभ करणे समाविष्ट आहे, असे बेस्टच्या अधिकाऱ्याने सांगितले.
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “15 नोव्हेंबर रोजी अधिक बसेसची आवश्यकता असल्यास, बस स्टॉपवर गर्दी कमी करण्यासाठी आम्ही त्या व्यस्त मार्गांवर तैनात करू.” या उपक्रमाचा उद्देश सणांदरम्यान लोकांसाठी एकूण प्रवासाचा अनुभव सुधारणे हा आहे.
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन त्यांच्या सोयीसाठी मुंबई शहर, पूर्व- पश्चिम उपनगरे, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, मिरा रोड, भाईंदर, मॅरेथॉन चौक (ठाणे), कोपरी (ठाणे), कॅडबरी जंक्शन (ठाणे) तसेच वाशी, नवी मुंबई, कोपरखैराणे, नेरुळ, ऐरोली, घणसोली स्थानक, सीबीडी बेलापूर इत्यादी ठिकाणी जाणा-या विविध बसमार्गांवर बेस्ट उपक्रमाच्या वतीने एकूण १४५ जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत.