मुंबई – मुंबईकरांना पाणीपुरवठा करणारे ‘तानसा’ धरण आज ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातून मुंबईकरांना दर दिवशी 450 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. दुपारी 3 च्या सुमारास हे धरण काठोकाठ भरून वाहू लागले. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धारणांपैकी तानसा धरण एक आहे. याअगोदर 12 जुलै रोजी तुळशी धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती आली होती. त्यानंतर आता तानसा धरणही ओव्हरफ्लो झाले असून, मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.