नवी दिल्ली – देश “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ साजरा करत आहे. या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत लाल किल्ल्याच्या बुरुजावरून मुख्य सोहळा पार पडला. पंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आले. पंतप्रधान लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले.
नेहमीप्रमाणे यावर्षीही लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत भारताची मान उंचावणाऱ्या खेळाडूंची उपस्थिती आकर्षणाचं केंद्र आहे. याशिवाय करोना योद्ध्यांसाठी विशेष ब्लॉकची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये सैनिक स्कूलमध्ये मुलींनाही प्रवेश देण्याची घोषणा केली आहे.
ते म्हणाले, ‘मागील अनेक वर्षात मला देशातील मुलींनी सैनिक स्कूलमध्ये शिक्षण मिळावं यासाठी विनंती केली. याबाबत आम्ही मिझोरममध्ये प्रयोग केला होता. तो यशस्वी ठरला आहे.
येत्या काळात आता देशातील सर्व सैनिक शाळांमध्ये मुलींनाही प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने निर्णय घेतला असून आता मुलीही तिथे शिक्षण घेणार.’ असेही ते म्हणाले आहे.