लोणावळा, (वार्ताहर) – प्रत्येकाने आपल्या घरात मराठी बोलली पाहिजे. दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढविला पाहिजे. मराठीचा जागर करणे आपल्या प्रत्येकाचे काम असून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणे गरजेचे आहे, असे मत व्ही. पी. एस. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर भगत यांनी व्यक्त केले.
लोणावळा एजुकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.
या वेळी ग्रंथदिंडी व भित्तीपत्रक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी डॉ. चंद्रशेखर भगत बोलत होते .लोणावळा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र देशमुख म्हणाले की, कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्याला मोठे योगदान दिले आहे. कुसुमाग्रजांच्या अनेक कवितांनी मराठी जणांना प्रेरणा दिली आहे. डॉ. विलास पाटील, पवन शिंगारे यांनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विलास पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र देवरे, प्रा. संदीप खाडे, प्रा. संतोष शिंदे, डॉ. पवन शिंगारे, प्रा. संदीप लबडे, प्रा. दीपक तारे, प्रा. धनराज पाटील, प्रा. भक्ती अहिर, प्रा. संजय साळुंखे यांचे योगदान मिळाले.
या वेळी माजी विद्यार्थी प्रफुल्ल पाळेकर, अजय ढम आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. राजेंद्र देवरे यांनी केले. तसेच आभार प्रा. दीपक तारे व प्रा. धनराज पाटील यांनी मानले. लोणावळा एजुकेशन ट्रस्टचे डॉ. बी. एन. पुरंदरे, एस. जी. गुप्ता वाणिज्य आणि एस. ए. मिठाईवाला विज्ञान महाविद्यालयात मराठी विभाग आणि कनिष्ठ महाविद्यालयातर्फे कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त ग्रंथदिंडी काढण्यात आली होती.