ओव्हल -भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याच्यावर विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात त्याने अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करणे गरजेचे होते. मात्र, तसे घडले नाही. तो पहिल्या डावात 14 तर दुसऱ्या डावात 49 धावांवर बाद झाला.
बाद होण्यात गैर नाही परंतु जे फटके खेळून तुम्ही बाद होता ते संतापजनक आहे. इतका मोठा अनुभव असूनही तुमचे शॉट सिलेक्शनच जर चुकीचे असेल तर निर्णय असाच लागणार, असेही गावसकर म्हणाले.
नेटमध्ये कसून सराव करणारा कोहली मी या सामन्यापूर्वी पाहिला आहे. मात्र, जर सरावात चुका होत नसतील तर मग प्रत्यक्ष सामन्यात अशा चुका कशा होतात, त्याचे आत्मपरिक्षण आता कोहलीने केले पाहिजे, असेही ते म्हणाले.