ओव्हलच्या खेळपट्टीवर जशी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तिथे आम्ही कमी पडलो. आमच्या गोलंदाजांना वाइड चेंडूंची रसदच त्यांना पुरवली. या पराभवाचे हेच एक मूळ कारण आहे, असे मत भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी व्यक्त केले आहे. सामना सुरू झाल्यावर त्यांचे तीन फलंदाज आम्ही लवकर बाद केले.
मात्र, त्यानंतर दीशाहीन गोलंदाजी केली व त्याचा लाभ ट्रेव्हीस हेड आणि स्टीव्ह स्मिथ यांनी घेतला व शतकी खेळी केल्या. त्यावेळी आमच्या गोलंदाजानी सतत त्यांच्यावर दडपण राखले असते तर इतकी मोठी धावसंख्या उभारणे त्यांच्यासाठी कठीण बनले असते व तेव्हा कदाचीत आम्हाला काहीतरी संधी राहिली असती.
जी गोष्ट गोलंदाजांची तीच स्थिती फलंदाजांमुळेही ओढावली. त्यांच्या फलंदाजांनी जिद्दीने खेळपट्टीवर ठाण मांडले, परंतु आमच्या फलंदाजांचे शॉट सिलेक्शन चुकले. खेळपट्टीवर स्थिरावल्यावरही जर इतक्या मोठ्या स्तरावर अशी चुका होत असतील तर आता आम्हाला आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे, असेही द्रविड यांनी सांगितले.