नवी दिल्ली: विशाखापट्टणममधील केमिकल प्लांटमधून 24 तासांच्या आतच पुन्हा एकदा गॅस गळतीझाल्याचे सांगण्यात आले आहे. रात्री अकरा वाजेच्या सुमारास अचानक गॅस गळती झाल्याचे जाणवू लागले. परंतु यावेळी प्रशासनाने तातडीने कारवाईचा बडगा उगारला आणि रात्रीच 5 किमीच्या परिघात असलेल्या सर्व लोकांना त्या परिसरातून हटवण्यात आले. दरम्यान, आता गॅस गळतीवर नियंत्रण ठेवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
जोपर्यंत गुजरातमधून आणण्यात आलेल्या पीटीबीसी रसायनाचा जोपर्यंत वापर केला जात नाही तोपर्यंत स्थलांतर करण्यात आलेल्या नागरिकांना आपल्या घरी परत जाता येणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर पुण्यातील एनडीआरएफ तज्ज्ञ चमूच्या नेतृत्वात गॅस गळतीला थोपवले आहे. मात्र या दुर्घटनेत आतापर्यंत ११ जणांचा बळी गेला आहे तर शेकडो जण गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.