मुंबई – ‘महाराष्ट्रात आता रामराज्य आले . भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले. इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार ! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार . काय ती झाडी काय तो डोंगार ? एकदम ओके सरकार’ असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात आता रामराज्य आले . भक्तांनी कालच एकमेकांचे तोंड गोड केले.
इथून पुढे शेतकऱ्यांचे पुर्ण कर्ज माफ होणार, पेट्रोल ५० रू, गॅस २५० रू होणार. महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् होणार ! बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार .
काय ती झाडी काय तो डोंगार ?
एकदम ओके सरकार— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 30, 2022
दरम्यान, मुख्यमंत्री पदाचा उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता नव्या सरकारच्या सत्ता स्थापनेसाठी वेगवान हालचाली सुरु आहेत. गोव्यातुन एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटात सेनेचे ३९ आमदार असून याचाच दाखल देत विद्यमान विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत चाचणीची मागणी राज्यपालांकडे मंगळवारी केली होती. सर्वोच्च न्यायालयाने देखील बहुमत चाचणीचाच निकाल दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अखेर राजीनामा दिला आहे.