उन्नाव – घरात असलेल्या पंख्यात विद्युत प्रवाह उतरला आणि त्यामुळे झालेल्या दुघर्टनेत एकाच कुटुंबातील चार भावंडांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील बारासगवर येथे ही घटना घडली. यावेळी या मुलांचे माता पिता शेतात गेले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व्हरांड्यात ठेवलेल्या पंख्याला एका मुलाचा स्पर्श झाल्यावर त्याला विजेचा धक्का बसला.
त्याला वाचवण्यासाठी त्याची अन्य भावंडेही तेथे धावली यात त्या सगळ्यांचा मृत्यू झाला. मयंक (वय 9), हिमांशी (वय 8), हिमांक (वय 6) आणि मानसी (वय 5) ही त्यांची नावे आहेत. विजेचा धक्का लागल्याने चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. हे चौघे सख्खी भावंडे आहेत.