नेवासा – अहमदनगर – औरंगाबाद (छ.संभाजीनगर) महामार्गावरील वडाळा (बहिरोबा) जवळ कार आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. यावेळी झायलो कार रस्ता दुभाजकाला धडकून समोरुन चाललेल्या आयशर टेम्पोला धडकल्याने उलटी झाली. या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर तीघा जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. जखमींना नगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
इंदौर येथील शनिभक्त देवदर्शन करुन परतीच्या प्रवासावर निघालेले असतांना त्यांच्यावर काळाने हा दुर्देवी घाला घातला. हा अपघात रविवार (दि.११) रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला असून शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी अपघातस्थळी पोहचून मदतकार्यास सुरुवात केली तसेच महामार्गावरील वाहतूक सुरुळीत करण्यास तातडीने सुरुवात केली. समोर आलेल्या माहीतीनुसार झायलो कार चालकाला डुलका लागल्याने हा अपघात झाला असलयाचे समजते.
या अपघातात ठार झालेल्या इंदौर येथील शनिभक्तांचा व्यक्तीपरिचय होत नसून पोलीस माहीती मिळण्यासाठी प्रयत्नशिल असल्याची समोर आले आहे.अविनाश प्रमोद मंडलेचा (२९) रा.महालक्ष्मी हिवरे (ता.नेवासा) तर राणू मनोहर शर्मा (३५) रा. इंदोर असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबतची अधिक माहीती घेण्याचे काम सुरु असल्याचे शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रामचंद्र कर्पे यांनी सांगितले.