नेवासा – नगर – औरंगाबाद महामार्गावर वडाळा (बहिरोबा) जवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे मजुर शनिवारी महामार्गावरील रस्ता दुभाजकाचे गवत काढत खड्डे बुजवण्याचे काम करत असतांना महामार्गावरील ढंपरला मागील बाजूने कंटेनरने दिलेल्या जोरदार धडकेत कंटेनर चालकासह दोन मजूर असे तीन जण ठार तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. ( Accident on Nagar-Aurangabad highway )
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी,की आठ ते दहा मजूर वडाळा (बहिरोबा) जवळ महामार्गावर रोजंदारीवर गवत काढण्याचे काम करत होते औरंगाबाद वरून भरगाव वेगाने नगरकडे जात असलेल्या कंटेनर क्रमांक (एम एच ४६ ९१५५) हा रस्त्यावर लावलेले बॅरिकेट ओलांडून समोर वेग नियंत्रित न झाल्याने मजुरांना उडवत कामासाठी असलेला टिप्पर (क्रमांक एम एस १६ सीसी ३२९२) जोराची धडक दिली.
या भिषण दुर्घटनेत रमेश भगवान माने (वय ५०) रा. बाभुळखेडा,ऋषिकेश संजय निकम (वय २५) रा.सलाबतपूर व कंटेवर चालकाचा अपघातात मृ्त्यु झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे भैय्या निकम (वय २३) रा.सलबतपुर,मेहबूब इब्राहिम शेख सलबतपुर, संभाजी आसाराम वायकर बाबुळखेडा,बाळासाहेब रघुनाथ पाटेकर गेवराई हे या अपघातात जखमी झाले अाहेत. ( Accident on Nagar-Aurangabad highway )
जखमींना नेवासा फाटा येथील रुग्णालयात प्रथमोपचार सुरु असून अपघातातील मयत ग्रामिण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षात दाखल करण्यात आले याबाबत राञी उशीरापर्यंत शनिशिंगणापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.