उस्मानाबाद – शेतातून घरी परतणाऱ्या शेतकरी कुटूंबावर काळाने घाला घातल्याची दुर्दैवी घटना कळंब तालुक्यातील वडगाव जहांगीर येथे घडली. कर्नाटकातील एका भरधाव ट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दोन महिलांसह एका लहान मुलीचाही घटनास्थळीच, तर एका मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या शिवाय अन्य एकजण गंभीर जखमी असून त्यांना उस्मानाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
कळंब व उस्मानाबाद तालुक्याच्या सीमेवरील वडगाव जहांगीर येथील शेतकरी दत्तात्रय शेटे (वय 35) हे वेळा अमावस्येचा सण साजरा करून बुधवारी रात्री 7.30 वाजेच्या सुमारास कुटुंबासह घरी परत येत होते. यावेळी बैलगाडीत त्यांच्यासह त्यांचा सात वर्षीय मुलगा युवराज शेटे, रेश्मा माळवदे (वय 40), फनुबाई पवार (वय 40) आणि रेश्मा माळवदे (वय 40) हे होते.
दरम्यान, बैलगाडी गावाजवळ आल्यानंतर औरंगाबादहून उस्मानाबादकडे भरधाव वेगात जाणाऱ्या कर्नाटकातील मालट्रकने बैलगाडीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला. तर बैलगाडीतील रेश्मा माळवदे त्यांची मुलगी गुंजन माळवदे, फनुबाई पवार या तिघींचा व बैलगाडीस असलेल्या बैलाच घटनास्थळीच मृत्यू झाला.