Kamran Akmal – सध्या भारत आणि पाकिस्तान ( Pakistan ) यांच्यात टी-२० विश्वचषकात होणाऱ्या सामन्याची चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. या दोन्ही देशांना क्रिकेटमधील कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाते. अश्यातच आता या दोन्ही क्रिकेट बोर्डांमध्ये नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारण मंगळवारी बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई संघटनेचे अध्यक्ष जय शहा यांनी या आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन दुसऱ्या ठिकाणी केले जाईल असे, जय शहा यांनी म्हटले होते. याच कारणावरून आता दोन्ही देशांच्या माजी खेळाडूंनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.
#JhulanGoswami | झुलन गोस्वामीच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट, ‘ही’ अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
भारत-पाकिस्तान ( Pakistan ) क्रिकेट सामना म्हटलं की, जगभरातील क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची उत्सुकता असते. तस पहिले तर याच सामन्याला सर्वात जास्त प्रेक्षक मैदानात हजर असतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा जगभरात पहिला जातो. त्यामुळे या दोन्ही देशांच्या क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये. त्याचबरोबर दोन्ही देशांनी एकमेकांच्या धर्तीवर क्रिकेट खेळायला हवे. असे पाकिस्ताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज कामरान अकमलने म्हटले आहे.
अकमल याने म्हटले की, “भारत आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तानात ( Pakistan ) आला नाही तर पाकिस्तान काय क्रिकेट खेळणे सोडून देणार नाही. मात्र अशा निर्णयाने पुढील पिढीचे नुकसा मात्र नक्की होणार आहे. पाकिस्तानात अनेक मोठमोठ्या देशांनी क्रिकेट खेळले आहे. त्यासाठी येथील सुरक्षा यंत्रणांनी मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यामुळे जय शहा यांनी क्रिकेटमध्ये राजकारण करू नये, त्यांनी ते भारतातच करावे.” असेही अकमलने म्हटले आहे.
याअगोदर भारतने २००८ साली शेवटचा आशिया चषक सामना पाकिस्तानच्या ( Pakistan ) धर्तीवर खेळाला होता. त्यानंतर या देशासोबत भारताने कसलेही देशांतर्गत द्विपक्षीय मालिका क्रिकेट खेळले नाही. कारण मुंबई शहरावर झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर भारतने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडले होते. यानंतरच्या काळात हे दोन्ही संघ फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्येच एकमेकांविरुद्ध क्रिकेट खेळतात.