नवी दिल्ली – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते आणि केरळचे (keral) माजी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन (V. S. Achuthanandan) आज शंभर वर्षांचे झाले आहेत. वयाची शताब्दी गाठणाऱ्या राजकारण्यांच्या पिढीचे ते एक दुर्मिळ नेते ठरले आहेत. आयुष्याची सुरुवात एका टेलरच्या कामापासून सुरु केलेल्या अच्युतानांदन यांनी मुख्यमंत्रीपदासह अनेक महत्त्वाची पदे त्यांच्या कारकिर्दीत अनुभवली आहेत. सर्व पक्षभेद बाजूला ठेवत, देशभरातून अच्युतानंदन यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे, हे विशेष.
अच्युतानंदन यांची प्रतिमा सर्वसामान्य लोकांच्या हिताशी निगडित मुद्द्यांसाठी लढणारा प्रामाणिक नेता अशी आहे. अच्युतानंदन पर्यावरण, महिलांचे हक्क यासारख्या मुद्द्यांवर सतत बोलत असत. त्यामुळे त्यांच्या काळातील सर्वात लोकप्रिय मार्क्सवादी नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करताना अच्युतानंदन यांनी केरळमधील भूमाफिया आणि रिअल इस्टेट माफियांविरुद्ध लढा दिला, त्यामुळे त्यांची लोकप्रियता समाजातील प्रत्येक वर्गात वाढली.
पक्षांतर्गतही प्रदीर्घ लढा झाला
अच्युतानंदन यांच्या लोकप्रियतेमुळे त्यांना 2006 आणि 2011 मध्येही पक्षाने विधानसभेचे तिकीट दिले. (Kerala politics) अच्युतानंदन 2006 ते 2011 पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते आणि त्यांनी एलडीएफ आघाडीचे यशस्वी नेतृत्व केले. केरळमधील लोकांमध्ये अच्युतानंदन यांची लोकप्रियता किती आहे, याचा अंदाज यावरून लावला जाऊ शकतो की 2016 च्या विधानसभा निवडणुकीतही पक्षाने त्यांचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढवली होती. मात्र, युतीच्या विजयानंतर अच्युतानंदन यांना मागे टाकत पिनरई विजयन यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली.
अच्युतानंदन हे सीपीआयच्या विभाजनपूर्व परिषदेतून सीपीआयएममध्ये सामील झालेल्या नेत्यांपैकी एक आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या अच्युतानंदन यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1923 रोजी केरळमधील अलाप्पुझा येथे झाला. गरिबीमुळे प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कपड्याच्या दुकानात काम करायला सुरुवात केली. नंतर ते एका कॉयर फॅक्टरीत मजूर म्हणून काम करू लागले. येथेच ते डाव्या विचारसरणीच्या प्रभावाखाली आले आणि मार्क्सवादी दिग्गज नेते पी. कृष्णा पिल्लई यांच्या संपर्कात आले आणि नंतर 1938 मध्ये कामगार संघटनेचे कार्यकर्ता बनले आणि नंतर 1940 मध्ये कम्युनिस्ट पक्षात सामील झाले.
ईएम शंकरन नंबूरीपद, एके गोपालन आणि ईके नयनार यांच्यासारख्या नेत्यांनंतर देशातील सर्वात लोकप्रिय डावे नेते म्हणजे अच्युतानंदन आहेत. अच्युतानंदन 1967, 1970, 1991, 2001, 2006 आणि 2011 मध्ये केरळ विधानसभेवर निवडून आले होते. 1992, 1996, 2001, 2006, 2011 आणि 2016 मध्ये ते विरोधी पक्षनेते होते. आज 100 वर्षांचे असूनही केरळच्या राजकारणात ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहेत.