चिंबळी – इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळपर्यंत विविध ठिकाणी कोल्हापुरी पद्धितीचे बंधारे बांधल्याने या परिसरात शेतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग विविध प्रकारची पिके घेत आहेत.
दरम्यान, उन्हाळी हंगामात लग्न समारंभात व दिवाळी-दसरानिमित्त दरवर्षी फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या भागातील शेतकरी वर्ग झेंडू, अष्टर, गलांड्या आदि फुलांच्या रोपांची लागवड करतो. गेल्यावर्षी पाऊस कमी झाला त्यातच इंद्रायणी नदीचे पाणी दूषित असल्याने चिंबळी परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरी व बोअरवेलच्या पाण्यावर फुलांच्या रोपांची लागवड केली होती. ही फुलशेती सध्या फुलोऱ्यात आली आहे मात्र, उन्हाची तीव्रता कमी होत नसल्याने उत्पादन घटले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. तसेच उत्पादन खर्च वसुल होणार की नाही या विवंचननेही शेतकऱ्यांना ग्रासले आहे.