लखनऊ – देशात करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन लावण्यात आला आहे. मात्र अशी परिस्थिती असताना सुद्धा अयोध्येतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एकाचा कुटुंबातील पाच जणांची धारदार शस्त्राचा वापर करुन हत्या करण्यात आली आहे. मृतांमंध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलांचा समावेश आहे. या घटनेने येथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली आहे.
उत्तर प्रदेशमधील अयोध्येतील इनायतनगर ठाण्याच्या क्षेत्रात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यात आली आहे. पती-पत्नी आणि तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या तिघांमधील दोन मुलं तर एक मुलगी आहे. या तिघांचंही वय दहा वर्षापेक्षा कमी आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. मालमत्तेच्या वादवरुन ही हत्या झाली असल्याचे शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अयोध्येतले वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही हत्या करण्यात किती जणांचा समावेश होता, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नसून पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.