हा फोटोतला सुशीलकुमार आठवतोय? 2011 साली हा पठ्ठ्या कोटी रूपये जिंकला होता तो ही स्वत:च्या बुद्धीच्या आणि ज्ञानाच्या जीवावर! एका रात्रीत करोडपती तर झालाच पण स्टारही बनला. एवढे पैसे की आले की मग इतर काहीही करायची गरजच काय? विविध कार्यक्रमांना हजेरी, मार्गदर्शन, सत्कार, समाजोपयोगी कार्यक्रमांसाठी देणगी अगदी दर महिन्याला.
लोकं काहीही कारण सांगून याच्याकडून पैसे घेऊन जायचे. पुढे मित्रही स्वार्थीच निघाले, भरपूर दारूचे, सिगारेटचे व्यसन लावून गेले! त्यात काहीही अनुभव नसल्याने कोणत्याही व्यवसायात तो पैसे गुंतवत गेला. अगदी सिनेमाही, नको ती संगत आणि अचानक आलेला भरपूर पैसा यामुळे सद्सदविवेक बुद्धीच नष्ट झाली.
बिहारच्या मोतीहारी जिल्ह्यातील सुशीलकुमारने मुंबईच्या फिल इंडस्ट्रीतही नशीब आजमावून पाहिले. काही मालिकांमध्येही पैसे गुंतवले. पण यश कुठेच मिळाले नाही. पुढे त्याच्याकडचे सर्व पैसे संपले, त्याचे करियरही उद्वस्त झाले, जे लोक त्याच्या पुढेमागे करत होते ते आता त्याला टाळू लागले. सर्वांनीच त्याला बेदखल केले.
कसातरी तो आता सावरतोय, दोन गायी घेऊन त्यांच्या दुधावर आता त्याची गुजराण सुरू आहे. आता त्याची पत्नीही त्याच्याबरोबर रहात नसल्याचे उघड झाले आहे. हे सर्व त्याने अलिकडेच स्वत:च सर्वांसमोर मांडलंय. आपल्या फेसबुक पेजवर शेवटी तोच म्हणतो it’s important to have little needs in life & work towards fulfilling it.