बीजिंग – भारत व अमेरिकेसह विविध देशांनी टाकलेला राजनैतिक बहिष्कार तसेच करोनाचा धोकाही कायम असतानाही अखेर शुक्रवारपासून चीनमध्ये बीजिंग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ झाला.
गलवान खोऱ्यात भारतीय सैन्याशीच लढलेल्या क्यु फबाओ या सैनिकाला स्पर्धेची मशाल सोपवण्याच्या निर्णयाला भारताने विरोधही केला होता तसेच स्पर्धेवर राजनैतिक बहिष्कारही टाकला आहे. तसेच या स्पर्धेच्या उद्घाटन तसेतच समोरोप सोहळ्याला भारताचा एकही राजनैतिक अधिकारी उपस्थित राहणार नाही. भारताच्या या निर्णयाला अमेरिकेसह अन्य काही देशांनीही पाठींबा दिला आहे. या स्पर्धेत भारताचा स्किइंगपटू अरीफ खान या एकमेव खेळाडूचा सहभाग असणार आहे.
गलवान संघर्षात भारताचे तब्बल 20 जवान शहिद झाले होते. त्यातच पीपल लिबरेशन आर्मीने याच सैनिकाला राष्ट्रीय नायक असे संबोधले होते व त्यावर भारताने आक्षेपही घेतला होता. हा संघर्ष एकीकडे असतानाच चीनमध्ये करोनाचाही धोका अद्याप कायम आहे.
राजधानीसह अनेक ठीकाणी अद्याप लॉकडाऊनही कायम असताना चीनने उन्हाळी ऑलिम्पिकसह आता हिवाळी ऑलिम्पिकचेही आयोजन केले. चीनचे अध्यक्ष शी जीनपिंग यांनी उद्धघाटन करत स्पर्धेला प्रारंभ झाल्याचे जाहीर केले.