पुणे : बँकाकडून शेतकऱ्यांना पीककर्ज उपलब्ध करून देण्यासाठी किसान कार्ड देण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना जवळच्या बँक शाखेत जाऊन अर्ज भरून द्यावा लागणार आहे. तसेच शेतकऱ्यांनी पीककर्ज नसल्याचे घोषणापत्र अर्जासोबत जोडायचे आहे. केंद्र सरकारच्या वित्तीय सेवा विभागाच्या निर्देशानुसार हि मोहीम राबवण्यात येईल.
संपूर्ण भरलेले अर्ज प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे. प्रधानमंत्री किसान कार्ड योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही कोणत्याही वित्तीय संस्था किंवा बँकेकडून कर्ज घेतले नाही अशा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नाबार्ड आणि जिल्हा अग्रणी बॅंकेच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री किसान योनजेचे बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान कार्ड उपलब्ध नाहीत. असे शेतकरी विविध योजनांपासून वंचित राहतात. अशा शेतकऱ्यांची माहिती घेऊन सर्व बॅंकांनी १५ दिवसांत किसान क्रेडिट कार्ड बँकांमार्फत कार्ड वितरित केले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहेत,आणि ते मत्सव्यवसाय,पशुसंवर्धन करतात त्यांना अतिरिक्त वित्त पुरवठा करण्यासाठी हे कार्ड दिले जाणार आहे.