Farmer Preotest । शेतीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) म्हणजे हमीभावासाठी कायदा करावा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करतायेत. त्यासाठी दिल्लीजवळच्या शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेत. दरम्यान, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा जाहीर केली आहे.
१० मार्च रोजी रेल रोको आंदोलन Farmer Preotest ।
आपल्या आंदोलनाची पुढची दिशा सांगताना शेतकऱ्यांनी, “आम्ही लगेच दिल्लीकडे कूच करणार नाहीत. हरियाणा-दिल्लीच्या सीमेवरच आम्ही ठाण मांडून बसणार आहोत” असे म्हटले. दरम्यान, या शेतकऱ्यांनी देशभरातील इतर शेतकऱ्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे देखील आवाहन केलंय. यासह शेतकरी १० मार्च रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन करणार असल्याचेही सांगितलं.
शेतकरी बस आणि रेल्वेने दिल्लीला जाणार Farmer Preotest ।
शेतकरी नेते सर्वनसिंग पंढेर यांनी आंदोलांविषयी बोलताना, “पंजाबच्या खनौरी आणि शंभू सीमेवरून शेतकऱ्यांना पुढे सरकू दिलं जात नाहीये. त्यामुळे ६ मार्च रोजी देशातील इतर राज्यांमधील शेतकरी बस आणि रेल्वेने दिल्लीला जाणार आहेत. शेतकरी आपल्या मागण्यांसाठी जंतर-मंतरवर सरकारविरोधात आंदोलन करतील. परंतु, पंजाबचे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरच आंदोलन करतील. शंभू आणि खनौरी सीमेवरील आंदोलन अधिक मजबूत करण्यासाठी आंदोलक शेतकऱ्यांची संख्या अधिक वाढवली जाणार आहे.” असे त्यांनी म्हटलं.
पंढेर पुढे म्हणाले, “आमचं दिल्लीच्या सीमांवरील आंदोलन चालूच राहील. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर आम्ही मागे हटणार नाही. सरकारला आमच्या ट्रॅक्टर्सची भीती आहे. त्यांना आमच्या ट्रॅक्टर्समध्ये रणगाडे दिसतायत. काही नेते तर म्हणतायत आम्ही आमचे ट्रॅक्टर्स मॉडिफाय केलेत. आम्ही आमच्या ट्रॅक्टर्सने सरकारला इजा पोहोचवू अशी भीती त्यांना सतावतेय. आम्हाला आशा आहे की आमचे जे सहकारी शेतकरी रेल्वे आणि बसमधून दिल्लीला जातायत त्यांना अडवलं जाणार नाही.”असेही त्यांनी यावेळी म्हटले.