नवी दिल्ली : देशात सध्या ३ मे पर्यंत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या लॉकडाउनमधून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि आरोग्य सेवा वगळण्यात आले आहे. आता केंद्र सरकारने आणखी थोडी सूट दिली आहे. ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि देखभालीसाठी आवश्यक असलेल्या सेवांना सूट देण्यात आली आहे. तसेच पीठाच्या गिरण्या, ब्रेडचे कारखाने हे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे मोबाइल प्रीपेड रिचार्जची दुकानंही सुरु राहतील. उन्हाळ्याचे दिवस असल्याने पंख्यांची दुकानंही सुरु राहतील. तसंच विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं आवश्यक असल्याने पुस्तकांची दुकानंही सुरु राहतील असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली.
Home Ministry has clarified to states that in-house care-givers of senior citizens, prepaid mobile recharge utilities and food processing units in urban areas are exempted from lockdown restrictions: Punya Salila Srivastava, Joint Secretary, Ministry of Home Affairs pic.twitter.com/awCWr0rl41
— ANI (@ANI) April 23, 2020
३ मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. जे हॉटस्पॉट किंवा करोना प्रतिबंधित क्षेत्र नाहीत तिथे २० एप्रिलपर्यंत काही गोष्टींना संमती दिली आहे. दरम्यान काही गोष्टींना आणखी सूट देण्यात आली आहे. त्यासंदर्भातले पत्र हे राज्य सरकारांना २१ एप्रिललाच पाठवण्यात आले आहे.
मधमाशी पालन, कृषी आणि फळबाग उत्पादन करणाऱ्या संशोधन संस्था, फळांची आयात निर्यात यांनाही संमती दिली आहे. लाखो भारतीय मर्चंट हे शिपिंग जहाजांवर काम करतात. लॉकडाउनमुळे त्यांना जहाजांवर कामसाठी जाता येत नाही किंवा काहीजण अडकून पडले आहेत. यामुळे नोकरी गमावू का? अशी भीती यांना आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने साइन इन आणि साइन ऑफ संदर्भातले निर्देश दिले आहेत. २१ एप्रिलच्या पत्रात यासंबंधीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.