सांगली – वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचे सोमवारी रात्री निधन झाले आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे अनुयायी म्हणुन विश्वासराव पाटील यांची ओळख होती.
माजी आमदार विश्वासराव पाटील यांच्याकडे नावाप्रमाणेच त्यांच्याकडील सर्वात महत्वाचा गुण म्हणजे विश्वास देणं किंवा दुसऱ्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास कायम ठेवण्याचा त्यांचा अट्टहास व हीच त्यांच्या राजकीय आणि व्यक्तीगत जीवनाच्या यशाची बलस्थाने ठरली. सांगली जिल्ह्यात त्यांचा मोठा लोकसंग्रह होता.
ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे वर्गमित्र होते. पाटील यांना कधीच सत्ता, पद, पैसा याचा मोह झाला नाही. त्यांच्या निधनाने वाळवा तालुक्यात शोककळा पसरली आहे.