पाटणा – बिहार विधानसभेच्या अटीतटीच्या निवडणुकीत अखेर एनडीएला अखेर बहुमत मिळाले आहे. यासह बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेतील. सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली.
एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. सर्व २४३ जागांच्या निकालानुसार, एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे.
या विजयानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
धन्यवाद बिहार!
बिहार कि जनता ने यह साफ कर दिया है की वे विकास चाहते है,ना की जंगलराज!
हमारे जनप्रिय प्रधानमंत्री मा@narendramodi जी इनके नेतृत्व पर मोहर लगायी है।@NitishKumarजी पर सम्पूर्ण विश्वास दिखाया है।मैं बिहार की जनता का कोटि कोटि अभिनंदन करता हूँ,उन्हें अभिवादन करता हूँ।— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 10, 2020
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस म्हणाले
‘बिहारमध्ये ऐन करोनाकाळात निवडणुका पार पडल्या. लोकशाहीच्या या उत्सवात जनतेने उत्साहाने सहभाग नोंदवला आणि जगासमोर एक आदर्श उदाहरण ठेवलं आहे. या निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मी निवडणूक आयोगाचेही आभार मानतो, देशभरात ११ राज्यांमध्येही पोटनिवडणुका पार पडल्या. या राज्यांत भाजपला चांगले यश मिळाले आहे.’