नवी दिल्ली – सत्तारूढ एनडीए आणि विरोधकांच्या महाआघाडीत सत्ता काबीज करण्यासाठी कॉंटे की टक्कर पहावयास मिळाली. एनडीएने थोड्या जागांच्या फरकाने विरोधकांच्या महाआघाडीला मागे टाकत बहुमताचा आकडा पार केला. यामध्ये जेडीयूला कमी जागा मिळाल्या असल्या तरीही बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार सातव्यांदा शपथ घेणार आहेत. अशातच नितीश कुमार यांना काँग्रेसने ऑफर दिली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी म्हंटले कि, भाजप आणि संघ अमरवेलीसारखे आहेत. ज्या झाडाला वेढतात ते वाळून जाते. नितीशजी लालू यांनी आपल्यासोबत संघर्ष केला आहे. आंदोलनात तुरुंगातही गेले आहेत. भाजप आणि संघाच्या विचारधारेला सोडून तेजस्वी यादव यांना आशीर्वाद द्या. या अमरवेलीरुपी भाजप आणि संघाला बिहारमध्ये आश्रय देऊ नका, असा सल्लाही त्यांनी नितीश कुमार यांना दिला आहे.
भाजपा/संघ अमरबेल के समान हैं, जिस पेड़ पर लिपट जाती है वह पेड़ सूख जाता है और वह पनप जाती है।
नितीश जी, लालू जी ने आपके साथ संघर्ष किया है आंदोलनों मे जेल गए है भाजपा/संघ की विचारधारा को छोड़ कर तेजस्वी को आशीर्वाद दे दीजिए। इस “अमरबेल” रूपी भाजपा/संघ को बिहार में मत पनपाओ।— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
नितीशजी, बिहार आपल्यासाठी छोटे झाले आहे. तुम्ही भारताच्या राजकारणात यावे. सर्व समाजवादी, धर्मनिरपेक्ष विचारधारेवर विश्वास ठेवणारे लोकांचे एकमत करण्यासाठी मदत करावी. संघाची इंग्रजांद्वारे ‘फोडा आणि राज्य करा’ नीतीला रुजू देऊ नका. विचार नक्की करा, असेही दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमारांना सांगितले आहे.
नितीश जी, बिहार आपके लिए छोटा हो गया है, आप भारत की राजनीति में आ जाएँ। सभी समाजवादी धर्मनिरपेक्ष विचारधारा में विश्वास रखने वाले लोगों को एकमत करने में मदद करते हुए संघ की अंग्रेजों के द्वारा पनपाई “फूट डालो और राज करो” की नीति ना पनपने दें। विचार ज़रूर करें।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
हीच महात्मा गांधी आणि जयप्रकाश नारायण यांच्या प्रति श्रद्धांजली ठरेल. आपण त्यांच्याच वारसाातून जन्माला आलेले राजकारणी आहात. तिथे परत या. मी तुम्हाला आठवण करून देऊ इच्छितो, जनता पार्टी संघाच्या दुहेरी भूमिकेमुळेच फुटली होती. भाजपा, संघाला सोडा आणि देशाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा, असे आवाहनदेखील दिग्विजय सिंह यांनी नितीश कुमार यांना केले आहे.
यही महात्मा गॉंधी जी व जयप्रकाश नारायण जी के प्रति सही श्रद्धांजलि होगी। आप उन्हीं की विरासत से निकले राजनेता हैं वहीं आ जाइए। आपको याद दिलाना चाहूँगा जनता पार्टी संघ की Dual Membership के आधार पर ही टूटी थी। भाजपा/संघ को छोड़िए। देश को बर्बादी से बचाइए।
— digvijaya singh (@digvijaya_28) November 11, 2020
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून एनडीएला बहुमत मिळाले आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा स्पष्ट झाले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने १२५ जागा मिळवल्या आहेत. यामध्ये ७४ जागा भाजपाने, ४३ जागा जदयूने तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. तर, महाआघाडीने ११० जागा मिळवल्या आहेत. यामध्ये सर्वात चांगली कामगिरी केली आहे ती राजदने. तेजस्वी यादव यांचा राजद हा ७५ जागा मिळवत बिहारमधला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.