लंडन – इंग्लंड व भारत यांच्यातील चौथा कसोटी सामना येत्या गुरुवारपासून ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच भारताच्या या मैदानावरील कामगिरीबाबत निराशाजनक वस्तुस्थिती समोर आली आहे.
हे मैदान भारतासाठी अनलकी ठरले असून येथे भारताने खेळलेल्या 13 कसोटी सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यातच विजय मिळवला आहे. या मालिकेतील नॉटिंगहॅम येथील पहिला सामना अनिर्णित राहिला होता.
त्यानंतर लॉर्डसवर भारताने तर, हेडिंग्लेवर इंग्लंडने विजय मिळवत पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेती 1-1 अशी बरोबरी केली.
या मैदानावर भारताला केवळ एकच कसोटी सामना जिंकता आला असून पाच कसोटी गमावल्या आहेत तर सात सामने अनिर्णित राहिले आहेत. या मैदानावर झालेल्या अखेरच्या तीनही कसोटी भारताने गमावल्या आहेत.