लंडन – भारताविरुद्धच्या लॉर्डस कसोटीत इंग्लंडने अत्यंत दर्जाहीन खेळ केला. इंग्लंडची ना फलंदाजी यशस्वी ठरली, ना गोलंदाजी यशस्वी ठरली. त्यातही ज्यो रूटचे नेतृत्वही कुचकामी ठरले, असेही आर्थरटनने म्हटले आहे.
भारताच्या तळातील फलंदाजांसाठी इंग्लंडच्या गोलंदाजांकडे कोणतीही योजना नव्हती. पहिला सामनाही पावसाचा व्यत्यय आला नसता तर भारताने सहज जिंकला असता. लॉर्डसवर पाचव्या दिवशी भारतीय संघाने इंग्लंडच्या फलंदाजांना प्रतिकारही करू दिला नाही. ज्या इर्षेने भारतीय संघाने खेळ केला तो इंग्लंडला जमलाच नाही. त्यांना साधे खेळपट्टीवरही उभे राहता आले नाही, असेही आर्थरटनने म्हटले आहे.