कोविड-19 च्या संकटामुळे भारताने बर्मिंघममधील कॉमनवेल्थ खेळातून माघार घेतली आहे. दरम्यान हीच कारणं देत इंग्लंडनेदेखील आगामी पुरुष हॉकी विश्वचषक जो भारतातील भुवनेश्वर येथे होणार आहे. त्यातून माघार घेतली आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोबम यांनी दिलेल्या माहितीत ते म्हणाले, इंडियन हॉकी संघाचे पुरुष आणि महिला दोन्हीही आगामी कॉमनवेल्थ खेळांमध्ये खेळणार नाहीत. कारण खेळ होत असलेल्या ब्रिटन येथे कोरोनासंबधी नियम अधिक कठोर केले आहे. लसीचे दोन्ही डोस झालेल्या भारतीयांनाही 10 दिवसांच्या विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे इंग्लंडच्या या भेदभावपूर्ण नियमांमुळे भारताने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान भारतीय पुरुष हॉकी संघ 2018 च्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये कांस्य पदकाच्या सामन्यादरम्यान इंग्लंडकडून 1-2 ने पराभूत झाला होता. तर महिला संघाला 0-6 ने मोठा पराभव झेलावा लागला होता. त्यानंतर यंदा मात्र कॉमनवेल्थमध्ये भारत आणि इंग्लंड हा सामना पाहता येणार नाही.