दोघेजण बचावले; कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर येथील घटना
कोपरगाव – मुशर्तपूर (ता. कोपरगाव) शिवारातील गांजेवाडी परिसरातील बंधाऱ्यावर मासे पकडण्यासाठी गेलेले तिघे मित्र पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडाले. त्यावेळी जवळच असलेल्या एकाच्या वडिलांनी वाहत्या पाण्यात उडी घेतली. दोघांना वचाविले पण पोटच्या मुलाला वाचविच्या प्रयत्नात ते दोघेही पाण्यात बुडून वाहत गेले. आज दुपारी ही घटना घडली.
सचिन संजय मोरे(वय 15), संजय मारूती मोरे (वय 35) असे मृत बाप-लेकाची नावे आहेत. पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, कोपरगाव तालुक्यातील मुशर्तपूर शिवाराच्या गांजेवाडी परिसरातील मंडपी बंधाऱ्यात मंगळवारी दुपारी साडे बाराच्या सुमारास सचिन संजय मोरे (वय 15), ओम दत्तात्रेय मोरे (वय 12) व शुभम योगेश पवार ही तीन मुले गांजेवाडी येथील घराजवळील पावसाच्या पाण्याने तुडुंब भरून वाहत असलेल्या मंडपी बंधाऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले.
पाण्याचा अंदाज न आल्याने एकाचा तोल जाऊन तो पाण्यात बुडू लागला. त्याला वाचविण्यासाठी आरडा-ओरड करीत इतर दोघे पाण्यात उतरले. पाण्याच्या गतीमुळे मुलांना पोहता येत असूनही गटांगळ्यात खात होते. आपला मुलगा, पुतण्या व त्यांचा मित्र पाण्यात बुडत असल्याचे संजय मारुती मोरे (वय 35) यांच्या लक्षात येताच त्यांनी वाहत्या पाण्यात उडी घेतली. शुभम पवार व पुतण्या ओम मोरे यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर लगेच मुलगा सचिन याला वाचविण्यासाठी झेप घेऊन त्याचा हात धरला. मात्र, हात निसटला आणि सचिन पाण्यात वाहत गेला.
मुलाला वाचविण्यासाठी संजय याने वाहत्या पाण्यात झेप घेतली. मात्र, ते दोघे त्या पाण्यात वाहत गेले. दुर्देवाने त्या बाप-लेचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच तहसीलदार विजय बोरुडे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष साहेबराव रोहम यांनी घटनास्थळी धाव घेतली.
ग्रामस्थांच्या मदतीने दोन तास प्रयत्न करून बाप-लेकांचे मृतदेह बाहेर काढले. यावेळी सरपंच पती अनिल दवंगे, तंटामुक्ती अध्यक्ष अन्वर शेख, संतोष गोसावी यांच्यासह अनेकांनी बाहेर काढण्यात मदत केली.दरम्यान, मृत संजय मारुती मोरे यांच्या पाश्चात्य पत्नी, भाऊ, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. तर मृत सचिन हा सर्वात मोठा मुलगा होता.