गांधीनगर :- महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळे विकासाला चालना मिळते. त्यांना सक्षम करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे “महिला-नेतृत्व विकास दृष्टीकोन” हा आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
भारताच्या जी 20 अध्यक्षपदाचा एक भाग म्हणून गुजरातची राजधानी गांधीनगर येथील महात्मा मंदिर येथे आयोजित ‘महिला सक्षमीकरणावरील मंत्रालयीन परिषदेला’ संबोधित करताना मोदी बोलत होते.
ते म्हणाले की, जेव्हा महिला समृद्ध होतात, तेव्हा जग समृद्ध होते. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणामुळे विकासाला चालना मिळते. शिक्षणातील त्यांचा प्रवेश जागतिक प्रगतीला चालना देतो. त्यांचे नेतृत्व सर्वसमावेशकतेला चालना देते आणि त्यांचा आवाज सकारात्मक बदलाला प्रेरणा देतो, असे पंतप्रधान म्हणाले.
भारत महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत आहे आणि त्यातील वेगवेगळे प्रगतीचे टप्पे गाठत आहे असा दावाही पंतप्रधानांनी यावेळी केला.