उद्धव ठाकरेंनी दुसऱ्याकडे पद देण्याऐवजी स्वत:च मुख्यमंत्री झाले
शिवसेनाप्रमुख बाळसाहेब ठाकरे सक्रिय राजकारणात होते. मात्र त्यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. तसेच सत्तेच्या लाभाचे पदही उपभोगले नाही. बाळासाहेबांच्या हयातीतच पक्षाची कमान उध्दव यांच्याकडे आली. मात्र उध्दव यांनी बाळासाहेबांप्रमाणे अन्य व्यक्तीला मुख्यमंत्रिपदावर बसवण्याऐवजी विधान परिषदेत दाखल होत स्वत: ते पद काबिज केले.
आदित्य ठाकरेंमुळे पुढं जाण्याचा मार्ग खुंटला
उध्दव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे मंत्री आहेत. त्यांनी तर विधानसभा जिंकत मंत्रिमंडळात प्रवेश केला. त्यामुळे भविष्यात शिवसेनेची सत्ता आली तरी ठाकरे पिता-पुत्रालाच संधी असणार. आपला तो मार्ग आता कायमचा बंद होणार याची शिंदे यांना खात्री झाली असावी. त्यामुळेंही त्यांनी बंडाचा मार्ग पत्करत शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला.
राष्ट्रवादीसोबत सत्तेत राहाणे खटकले
आणखी एक कारण म्हणजे राष्ट्रवादी सोबतची आघाडी कदाचित त्यांना मानवत नसावी. त्याचे कारण ठाण्यात त्यांची टक्कर राष्ट्रवादी कॉंग्रेसशीच राहीली आहे. या पक्षाची भूमिका भलेही धर्मनिरपेक्ष वाटत असावी. मात्र ठाण्यात तर त्यांची मुस्लिम अनुनयाचीच भूमिका राहीली आहे. ठाण्यातला राष्ट्रवादीचा चेहरा व राज्यातले मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तर गुजरातमधील एन्काउन्टरमध्ये ठार झालेली इशरत जहां ची उघड उघड बाजू घेतली होती. आताच्या वातावरण त्यांच्या सोबत उभे राहणे शिंदे यांना मानवत नसावे.