जालंधर – पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यात सरकार चालवताना अत्यंत धाडसाने निर्णय घेतले आहेत. प्रामाणिकपणाचे चांगले उदाहरण त्यांनी घालून दिले असून ते त्यासाठी कोणताहीं निर्णय घेण्यास मागे पुढे पहात नाहीत असे कौतुगोद्गार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काढले आहेत.मान सरकारला राज्यात सत्तेवर येऊन तीन महिने पुर्ण झाले आहेत.
ते म्हणाले की मागील सरकारांनी राज्यात माफियांना पोसले होते. पण मान यांनी माफियांना धडा शिकवण्याचे काम केले असून आत्तापर्यंत राज्यातील 130 कुख्यात गुंडांना त्यांनी गजाआड केले आहे असे ते म्हणाले. पंजाबात वाहतूक माफीयांसह अन्य क्षेत्रातील माफियांच्या टोळ्या कार्यरत आहेत त्यांच्यावर जरब बसवण्याचे काम मान यांनी केले आहे असे ते म्हणाले.
पंजाबातून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पंजाब सरकारने लक्झरी बस सेवा सुरू केली असून या बसला मान आणि केजरीवाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केजरीवाल म्हणाले की आम आदमी पक्षाने पंजाबातील लोकांना निवडणुकीत जी आश्वासने दिली होती ती सारी आश्वासने शक्य तितक्या लवकर पुर्ण केली जातील. मुख्यमंत्री म्हणाले.