गाझियांतेप (तुर्कीये) – तुर्की आणि सीरियात झालेल्या भयंकर भूकंपात बळी गेलेल्यांची संख्या किमान 19 हजारांवर गेली आहे. अनेक लोक अद्यापही ढिगाऱ्याखाली अडकलेले असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्या भागांत पोहोचण्यासाठी बचाव पथकांना संघर्ष करावा लागतो आहे. भूकंपामुळे कमकुवत झालेल्या इमारती कोसळण्याचाही धोका आहे. सर्वात जास्त नुकसान झालेल्या भागात पोहोचण्यासाठी बचाव कर्मचारी धडपडत आहेत.
तुर्कीमध्ये रात्रीच्यावेळी प्रचंड थंडी असल्यामुळे बचाव आणि मदत कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही अडथळे येत आहेत. अजूनही विस्थापितांसाठी आश्रयाच्या छावण्या उभारल्या जाऊ शकल्या नाहीत. त्यामुळे शेकडो भूकंपग्रस्तांना अजूनही कच्च्या आश्रय छावण्यांमध्येच वास्तव्य करायला लागते आहे.
मदतकार्य खूमपच संथ गतीने होत असल्यीाच्या तक्रारी स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. सीरियातील भूकंपग्रस्तांनी मदतीच्या आशेने तुर्कीयेच्या सीमा भागात गर्दी करायला सुरुवात केली आहे. दरम्यान, सीमेच्या दोन्ही बाजूंच्या आपत्कालीन दलाने वाचलेल्यांचा शोध घेण्यासाठी रात्रभर काम केले. मदत न पोचलेल्या भागातील नागरिकांनी अद्याप आपल्या आशा सोडल्या नाहीत आणि मदतीची प्रतिक्षा करत आहेत.
भारताने उभारले फिल्ड हॉस्पिटल –
भारतीय सैन्याने तुर्कीयेतील हाते प्रांतातील इस्केंडरुन येथे फील्ड हॉस्पिटल उभारले आहे. हे फील्ड हॉस्पिटल भूकंपग्रस्तांवर उपचार करेल, असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर म्हणाले. भारतीय वैद्यकीय आणि गांभीर्याने काळजी घेणाऱ्या तज्ञांची एक टीम आणि उपकरणे आपत्कालीन परिस्थितीत उपचार करण्यासाठी तयारी करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. हे फिल्ड हॉस्पिटल ऑपरेशन थिएटर, एक्स-रे मशीन, व्हेंटिलेटर इत्यादींसह 30 खाटांची पूर्ण सुसज्ज वैद्यकीय सुविधांनी सज्ज असेल, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले,