बॉलिवूडचा बहुप्रतिक्षित विवाह अखेर पार पडला. रणबीर आणि आलियाचे चाहते ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आणि पारही पडला. लग्न झाल्यापासून ‘रणबेलिया’च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावर शुभेच्छा आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे. लग्नाच्या फोटोंसोबतच आता रणबीर आणि आलियाच्या लग्नाशी संबंधित अनेक माहितीही समोर येत आहे.
नुकत्याच एका रिपोर्टमध्ये अभिनेत्रीच्या लग्नाशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री आलिया भट्टचा भाऊ राहुल भट्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्रीने तिच्या लग्नात सात नव्हे तर केवळ चार फेरे घेतले आहेत. एका वेबसाइटशी बोलताना राहुलने सांगितले की, एका खास पंडिताने रणबीर-आलियाचे लग्न लावून दिले आहे. तो म्हणाला की, ‘आलिया आणि रणबीरच्या लग्नात एक खास पंडित होता, जो कपूर कुटुंबाशी अनेक वर्षांपासून जोडला गेला होता.’
लग्नादरम्यान केवळ चार फेऱ्यांचे वर्णन करताना राहुल भट्ट म्हणाले की, पंडितजींनी प्रत्येक फेरीचे महत्त्व सांगितले. एक फेरी धर्मासाठी आहे आणि दुसरी मुलांसाठी आहे. हे सर्व खूप मनोरंजक होते. मी अशा घरातून आलो आहे जिथे तुम्हाला सर्व धर्माचे लोक भेटतील. रेकॉर्डसाठी सात फेऱ्या नव्हे तर केवळ चार फेऱ्या झाल्या आहेत. या चार फेऱ्यांमध्ये मी तिथे उपस्थित होतो.
रणबीर-आलियाच्या लग्नानंतर सर्वजण त्यांच्या रिसेप्शनची आतुरतेने वाट पाहत होते. आधीच्या बातम्यांनुसार, लग्नानंतर, हे जोडपे 16 आणि 17 एप्रिल रोजी इंडस्ट्रीतील त्यांच्या मित्रांसाठी दोन भव्य रिसेप्शन आयोजित करणार होते. मात्र अलीकडेच मीडियाशी बोलताना रणबीरची आई अभिनेत्री नीतू कपूर यांनी कोणत्याही प्रकारचे रिसेप्शन होणार नसल्याची माहिती दिली.