नेवासा – हल्लीच्या राजकारणात खऱ्या निष्ठांवत कार्यकर्त्यांना डावले जात आहे. नेत्यांपुढे हुजेरीगिरी करणाऱ्या ‘चमचे’चींच चलती राजकारणात निर्माण झाल्याने निष्ठावंत लोक आपल्या नेत्यांपासून ‘चमच्यांमुळे’ दोन हात बाजूला सरकले जात आहे. वास्तवात राजकीय आखाड्यात नेत्यांच्या पुढे जमा होणाऱ्या डोमकावळ्या सारख्या ‘चमचेमुळे हे स्पष्ट होताना दिसून येते.
राजकारणात आपल्या नेत्यांचा रुबाब वाढण्यासाठी व सर्व सत्तास्थाने आपल्या नेत्यांच्या ताब्यात येण्यासाठी निष्ठावान कार्यकर्ते रक्ताचे पाणी करुन गावात कष्ट घेत आहेत. असे असताना ‘मेहनत करे मुर्गी ओर अंडा खायें’ फकीर ? या युक्तीमुळे चमचे चमकोगिरी करताना दिसत आहे. यामुळे निष्ठावान कार्यकर्त्यांच्या फुनग्या लावून सध्या वरचढ होत असल्याचे निष्ठावान कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहेत.
त्यामुळे धन्याला धतुरा अन् चोरांना मलिदा मिळत असल्यामुळे आपल्या नेत्यांसाठी मेहनत घेवूनही त्याचे फळ ‘चमचे’ अगलद उचलत आहे. ते आपल्या नेत्यांना सांगून निष्ठावान कार्यकर्त्यांना बाजूला सारत असल्याने या पितळाचे कान असणाऱ्या नेत्यांना निष्ठावान कार्यकर्त्यांचा करिष्मा कधी समजणार ? असा सवालही निष्ठावान कार्यकर्त्यांतून उपस्थित केला जात आहे.
निष्ठावान कार्यकर्ते आपल्या नेत्यांचा आदेश मानून फुगीरपणा न करता आपले काम इमाने – इतबारे करत असतांना या कामाचे ‘श्रेय’ अलगद चमके उचलत आहे. तसेच निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या फुनग्या आपल्या नेत्यांपुढे लावून ‘हम भी किसीसे कम नंही’ ? हे दाखवून देत आहे. सध्या सर्वच पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आपल्या नेत्यांवर खरी श्रद्धा असतांनाही चार हात लांब रहात असल्याचे बोलले जात आहे. याबाबत आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचे मतही निष्ठावंत कार्यकर्त्यांतून व्यक्त होताना दिसत आहे.
खऱ्याचे खोटे करुन निष्ठावंतांच्या फुनग्या लावण्याचा एककलमी कार्यक्रम ‘चमचे’ राबवत आहे. आपल्या नेत्यांपुढे छबी घेवून ‘ती’ सोशल मीडियात प्रसारित करुन आपला नेताच आपल्यापुढे नसल्याचा अभास निर्माण करत आहेत. सध्या चमचे सर्वच राजकीय पक्षात पावरफुल्ल होताना दिसत असल्यामुळे निष्ठावंत सध्या राजकीय फडात इमाने – इतबारे काम करुनही चमच्यांमुळे बाजूला सरकले जात आहेत. या चमच्यांबाबत राजकीय फडात सर्वञ नाराजीचा सुरु निर्माण होताना दिसत आहे.