पेठ – मागील दोन-तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. पेठ येथील शेतकरी संदीप किसन ढमाले यांच्या नवीन विहिरीचा कठडा ढासाळला आहे. त्यामुळे ढमाले यांचे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
ढमाले यांनी नुकतेच विहिरीला सिमेंट क्रॉंकिटचे बांधकाम केले होते. पावसामुळे पाण्याचा लोंढा तसेच राडारोडा विहिरीच्या दिशेने आल्यामुळे राडारोडा कठड्यासह विहिरीत कोसळला. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ढमाले हवालदिल झाले आहेत. तलाठी हेमंत भागवत आणि कोतवाल संदीप तोत्रे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. ढमाले यांनी लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.