मुंबई – गुजरात निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण चंगलेच तापले होते. नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील उद्योग महाराष्ट्राबाहेर गेल्याने महाविकास आघाडीने सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला असं वाटत असतानाच राष्ट्रवादीचे नेते जयंत अप्टिल यांनी एक ट्विट करत पुन्हा एकदा या मुद्द्याची आठवण करून दिली आहे.
महराष्ट्रातील उद्योग राज्याबाहेर गेले त्यावेळी राज्यात सरकार शिंदे फडणवीस यांचे होते. उद्योग बाहेर जाताच सोशल मीडियावर सरकार विरोधात अनेक मिम्स आणि बॅनर्स फिरू लागले होते. आता जयंत पाटील यांनी देखील ट्विटद्वारे पुन्हा एकदा यावर भाष्य केलं आहे. “फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा !” अशा कॅप्शनखाली पाटील यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तीन बॅनर्स दिसत आहेत.
एका बॅनरवर दूध मागोंगे दूध देंगे असं लिहिलंय तर दुसऱ्यावर खीर मांगोंगे खीर देंगे, असं लिहिलय. तर तिसऱ्या बाणावर मात्र मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा फोटो असून त्यावर इनव्हेसमेंट मागोगे युपी गुजरात को देंगे असं लिहिलं आहे.
फोटोतील प्रतिमा व शब्दांचा वास्तवाशी काही संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा! 🤫 pic.twitter.com/CxBBRMtaKn
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) January 9, 2023
जयंत पाटील यांनी शेअर केलेल्या या फोटोवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. अनेकांनी हा फोटो शेअर देखील केला आहे. अधिवेशन जरी संपलं असलं तरी पुन्हा एकदा ट्विट करत जयंत पाटील यांनी महाराष्ट्रातून उद्योग गेलेले आहेत या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे.