बंगळुरू – पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये करोनाचा मोठा धोका नाही म्हणून तिथे क्रिकेटच्या मालिका आयोजित करण्याचे धोरण योग्य नाही. जगात अद्याप हा धोका कायम असल्याने स्पर्धेचा विचारही करू नये, असे मत व्यक्त करत भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळावर ताशेरे ओढले आहेत.
सध्याचे वातावरण पाहता करोनाचा धोका अद्यापही कायम आहे आणि हा धोका कधी संपुष्टात येईल हेदेखील कोणी सांगू शकत नाही. ज्या देशांत हा धोका खूप कमी आहे म्हणून तिथे स्पर्धा घ्यायची चाचपणी केली जात आहे ती योग्य नाही, असेही द्रविडने व्यक्त केले.