नवी दिल्ली – करोनामुळे ठप्प झालेल्या देशांतर्गत क्रीडा स्पर्धांना लवकरच प्रारंभ होईल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी व्यक्त केला आहे.
मार्चपासून भारतासह जगभरात करोनाचा धोका वाढल्याने सर्व स्पर्धा रद्द करण्यात आल्या तसेच काही काळानंतर पुढील वेळापत्रकानुसार निश्चित केलेल्या स्पर्धाही लांबणीवर टाकण्यात आल्या. आता परिस्थितीत सुधारणा होत असून देशांतर्गत स्पर्धांबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासाठी शासनाने आखलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत असून खेळाडूंच्या आरोग्याचीही पूर्ण काळजी घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.