मुंबई – “शिवसेनेच्या जवळ असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे? की, ही फक्त नौटंकी आहे” असा सवाल करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
CM is meeting all the concerned agencies n fixing responsibilities on engineers for potholes in Mumbai..
Y doesn’t he punish the CONTRACTORS who r paid tax payers money n still haven’t done their job?
Does he hv the guts 2 punish contractors who r close Sena?
Or just nautanki!— nitesh rane ( Modi ka Parivar ) (@NiteshNRane) September 29, 2021
राज्यातील खड्ड्यांबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली होती. राज्यातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवर पडलेल्या खड्यांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री आणि सर्व वरिष्ठ मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावरुन राणे यांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष केले आहे.
नितेश राणे म्हणाले की, “मुख्यमंत्री सर्व संबंधित यंत्रणांना भेटत आहेत व मुंबईतील रस्त्यांवरील खड्डयांची जबाबदारी इंजिनिअर्सवर निश्चित करत आहेत. रस्ते बनवणाऱ्या कंत्राटदारांना कर दात्यांचा पैसा दिला जातो. पण तरी ते त्यांचे काम चोख करत नाहीत. मग मुख्यमंत्री कंत्राटदारांना शासना का करत नाही? शिवसेनेच्या जवळ असलेल्या कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मुख्यमंत्र्यांमध्ये धमक आहे? की, ही फक्त नौटंकी आहे” असे ट्वीट त्यांनी आज केले आहे.