राजेंद्र वाघमारे
नेवासा – अंगणवाडीतून लहान बालकांना देण्यात येणाऱ्या नित्कृष्ठ आहारामुळे बालचिमुकले आजारी पडले जात असून अंगणवाडीच्या आहारात अन्नभेसळ प्रक्रिया करणाऱ्या बचत गटाचा परवाना रद्द करण्यात यावा अन्यथा बालगोपाळांसह नेवासा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा धामोरी (ता.नेवासा) येथील ग्रामस्थांनी निवेदनाव्दारे दिला आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,धामोरी येथील अंगणवाडीमध्ये नित्कृष्ठ दर्जेचा आहार लहान मुलांना वाटप करण्यात येत असून त्यामध्ये भेसळयुक्त पामतेल मुलांना खाण्यासाठी वापर केला जात आहे तर साखरेचेही पाणी झालेले असून ‘त्या’ साखरचे गोळे झालेले आहेत तर तांदूळही कुपनचा वापरला जात असल्याचे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाच्या तक्रारीत म्हटले आहे.
धामोरी येथे अंगणवाडी सुरु झाल्यापासून लहान मुलांना नाष्टाच दिला जात नाही माञ ‘तो’ रेकॉर्डला दाखविला जात आहे ज्या बचत गटामार्फत या अंगणवाडीला आहार दिला जातो त्यामध्ये भेसळ केली जात असल्यामुळे शासनाची फसवणुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल करुन बचत गटाच्या आहाराचा परवाना रद्द करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे अन्यथा बालगोपाळासह नेवासा तहसिल कार्यालयावर मोर्चा काढू असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनात देवून जिल्हा परिषदेपासून थेट राज्याच्या मुख्यमंञ्यांपर्यत निवेदन लेखी तक्रार करण्यात आलेली आहे.