पुणे – खडकवासला प्रकल्पांतील चार धरणांत मिळून एकूण पाणीसाठा 82 टक्के म्हणजे 23.90 टीएमसी इतका जमा झाला आहे. दरम्यान खडकवासला धरणात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून नदीत विसर्ग थांबवण्यात आला आहे. सद्यस्थितीत खडकवासला प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. मागील दोन-चार दिवसांपासून चारही धरणांच्या पाणलोट परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने पाण्याचा येवा कमी झाला आहे.
खडकवासला धरणात बुधवारी दिवसभरात पानशेत-8, वरसगाव-9 आणि टेमघरमध्ये 10 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सध्यस्थितीत खडकवासला धरणात 1.91 टीएमसी म्हणजे 97 टक्के, पानशेत धरणात 9.40 टीएमसी म्हणजे 88.27 टक्के, वरसगावमध्ये 10.29 टीएमसी म्हणजे 80.25 टक्के आणि टेमघरमध्ये 2.30 टीएमसी म्हणजे 62 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.