पवनानगर (वार्ताहार ): मावळ तालुक्यासह पिंपरी चिंचवड शहराला वरदान ठरलेले पवना धरणाचा पाणी साठा ९८ टक्के झाला आहे.धरणाचे सहा गेट अर्ध्या फुटाने उचलुन त्यामधुन २२०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. जुन-जुलै महिन्यात पावसाने उघडीप दिल्याने पाणी टंचाईची भिती निर्माण झाली होती तर धरणातील पाणीसाठा ३२ टक्के झाला होता सातत्याने पडलेल्या पाऊसामुळे पाणीसाठा झपाट्याने वाढत गेला १ जुन पासुन पवना धरणात १५४३ मीमी पाऊसाची नोंद झाली आहे.
गेल्यावर्षी याच तारखेला ३ हजार १५४ मीमी एवढा पाऊसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात ८२ मीमी ईतक्या पाऊसाची नोंद झाली आहे.पवना धरणात १ जुन पासुन ६२.७१ टक्के इतकी वाढ झाली आहे.पवना धरण ९८ टक्के भरलेलं आहे व पवनाधरणातुन सकाळी १० वाजल्यापासुन सांडव्यावरुन सहा गेट अर्धाफुटाने उचलुन त्या मधुन २२ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
धरणपाणलोट क्षेत्रात पाऊसाचे प्रमाण वाढले व पाण्याची लेवल वाढली तर तसा धरणातुन विसर्ग वाढविण्यात येणार आहे. अशी माहिती पवना पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अशोक शेटे यांनी दिली. पवना धरणामध्ये २३६.२ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त पाणी साठा आहे या वर्षी पवना धरण भरले की नाही अशी चिंता नागरीकांना वाटतं होती मात्र धरण ९८ टक्के भरल्यामुळे शेतकऱ्याने सह नागरीकांनमध्ये आनंदाचे वातावरण आहे.