दुबई – दिनेश कार्तिकची यंदाच्या मोसमातील कामगिरी व त्याची तंदुरुस्ती हेच कारण होते की त्याला पाकिस्तानविरुद्धच्या आशिया करंडक स्पर्धेतील लढतीत संघात स्थान दिले गेले, असे स्पष्टीकरण भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने दिले आहे.
ऋषभ पंत भरात असला तरीही कार्तिकची पाकिस्तानविरुद्धची यापूर्वीची कामगिरी हे देखील एक कारण यामागे असावे असे सांगितले जात आहे. गेल्या काही काळात पंतच्या कामगिरीत सातत्य राहिलेले नाही. उलट कार्तिकने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केली आहे.
पंत गेल्या 6 टी-20 सामन्यांपैकी एकाही सामन्यात अर्धशतकी खेळीही करु शकलेला नाही. कार्तिकने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत फिनिशर म्हणून सरस कामगिरी केली आहे. तसेच त्याने यापूर्वी अनेकदा मोठ्या स्पर्धांमध्ये अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केली आहे, त्यामुळेच त्याला पसंती मिळाल्याचेही सांगितले जात आहे. (Dinesh Karthik replaces Rishabh Pant in Asia Cup match against Pakistan)
दरम्यान, आशिया चषकातील दुसऱ्या सामन्यात भारतानं पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट्स राखून विजय मिळवला. नाणेफेक गमावल्यानंर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानच्या संघानं भारतासमोर 20 षटकात 148 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात भारतीय संघानं हे लक्ष्य 19.4 षटकांत पूर्ण केलं.