रांची – भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा बाजार मांडला आहे. आमदारांची खरेदी-विक्री करणे हाच यांचा मुख्य धंदा झाला आहे. राजकारणाचा असा बाजार मांडणाऱ्यांना जनतेकडूनच आता उत्तर मिळेल असे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Chief Minister Hemant Soren) यांनी म्हटले आहे. झारखंडमधील सरकार पाडण्याचाही भाजपचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्रिपदाची आपल्याला काळजी नाही, तर झारखंडमधील लोकांची काळजी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सरकार भक्कम असून भाजपचा डाव उधळला जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेस पक्षही या सरकारच्या मागे ठामपणे उभा असून सरकारला कसलाही धोका नाही असे कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते गुप्ता यांनी सांगितले.
81 सदस्यांच्या झारखंड विधानसभेत सत्तारूढ आघाडीकडे एकूण 49 सदस्य असून त्यात झारखंड मुक्ती मोर्चाचे 30, कॉंग्रेसचे 18 आणि एका अपक्षाचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने एका गैरव्यवहार प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आमदार म्हणून अपात्र घोषित करावे, अशी शिफारस राज्यपालांकडे पाठवली आहे. (BJP has set up a market of politics, buying and selling of MLAs is their business – Chief Minister Hemant Soren)